STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

4  

Manisha Awekar

Tragedy

पाहू रे किती वाट

पाहू रे किती वाट

1 min
533

मन झाले हो चिंतित

आता शिवार तापलं

लई भेगाळली भुई

द्येवा कवा गंधाळलं ?  (1)


वृक्षवल्ली का तोडली ?

-हास पर्यावरणाचा 

वसुंधरा झाकोळली

दोष सारा मानवाचा  (2)


लागे नजर आभाळी

जाती नक्षत्रे कोरडी 

नद्या विहीरी आटल्या

पिके पडली उघडी   (3)


कर्ज होय पिकापायी

काय करु उमजेना ?

पीक नाही उगवलं

कसे सांगावे सुचेना ?  (4)


फक्त एक मार्ग दिसे

मला आता सुटण्याचा

फास घेताच सुटेल 

प्रश्न आयुष्यभराचा  (5)


गुरेढोरे भुकेलेली

पोरं चेहरे टाकून

अशामधी मृत्युसुद्धा

कसा घेईल वेढून ?   (6)


असे जगणे-मरणे

देवा अवघड झाले 

कर वर्षाव रे आता

प्राण कंठाशीच आले  (7)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy