महात्मा गांधी
महात्मा गांधी
सत्य, अहिंसेचे पुजारी
जन्मले गुजरातच्या पोरबंदर ग्रामी
माता पुतळाबाई पिता करमचंद गांधी
नामकरण केले मोहनदास गांधी
साधी रहाणी उच्च विचारश्रेणी
सत्य अहिंसेचे नित्य पुजारी
स्वदेशी वस्तूंचे सन्मानकर्ते
दाखवली उपोषणाची ताकद भारी
सत्याग्रहाची अफाट ताकद
दाखवून दिली जगतामधी
सत्यमेव जयते चा नारा
अजुनी दुमदूमे आसमंतामधी
नका वाईट पाहू, बोलू ,ऐकू
शिकवण दिली सत्याची
चले जावो म्हटले ब्रिटिशांना
बँरिस्टरची स्वातंत्र्य झुंज शर्थीची
मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास
सत्य, अहिंसेच्या मार्गाने
बनले राष्ट्रपिता, पदवी महात्मा
भारतवासीयांनी दिली प्रेमाने
हे राम हे शब्द अखेरचे
दर्शवतात जीवन साधना
जन्मला या भारतभूमीतअसा महात्मा
हे आपले सौभाग्य म्हणा