महाराष्ट्राचे वैभव-गड किल्ले
महाराष्ट्राचे वैभव-गड किल्ले
आमच्या महाराष्टाचे वैभव
आहेत सारे गड किल्ले
येथील प्रत्येक किल्यावर
मावळ्यांनी शौर्य गाजवले
पराक्रमाने मराठ्यांच्या
नभांगण हे दुमदुमले
मिळवण्यास स्वराज्य हे
कित्येकांनी जीव गमावले
शिवबां च्या मनी शिवनेरी
स्वराज्याचे बीज पेरले
पुढे जाऊनी राजांनी
स्वराज्यास जन्मास घातले