STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

कोणीच कसं बोलत नाही

कोणीच कसं बोलत नाही

1 min
281

ज्यांना आम्ही खुर्चीवर बसवले

तेच आमच्यासाठी कसे शाप झाले ?

हुकूमशाही का म्हणून ? हा कुठला न्याय

शेतकरी , कामगार , विद्यार्थी रसत्यावर


एवढे कसे आम्ही संवेदनाहीन मुर्दाड झालोय

संपलीय आमच्यातील माणुसकी , प्रेम , करुणा

कुठे गेलीत ती माणसे जीवाला जीव देणारी

अन्याय , अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारी


बलात्कार , लूटमार , काळाबाजार बोकाळला

खुर्चीतला संधीसाधू बगळा विनाकारण चेकाळला

त्यांच्या पापात सहभागी जे कोणी लाल झाले

हिशोब करील जनताच योग्य वेळ आल्यावर


निरपराधाना जेल , अपराध्यांना धाक नाही

इरादा त्यांचा पाक नाही ,एवढं सारं घडताना

लाखो लोक मरताना ,महागाई वाढताना

बघत बसलोय आम्ही फक्त तमाशा ?


विकली गेली असतील काही पण

बाकीच्यांना का गाढ झोप लागलीय

हल्ली सारे कसे हवालदिल निराश

कोणीच कसं बोलत नाही ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy