केतकी
केतकी
काळोखत जाणारे इंद्रियांचे भान
जेव्हा घुसमटते प्रकाशाच्या सीमारेषेवर
तेव्हा......
मला आठवतं..
एखाद्या केतकी संध्याकाळी
तू आणलेली ,
काळोखी चांदणी रात्र..
मी पांघरुन बसते , त्या आठवणींचे उबदार पदर
आणि नकळत गुरफटते मऊशार दुलईत....
पण... कुठूनसा अचानक वारा उधळतो ,
सैरभैर... मी ,
मग मात्र धांदल उडते ,
उडत्या पदराला सावरण्यासाठी.......
