ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
काही लोक ६०-६५ वर्षे गाठी
म्हणे त्यांची बुध्दी झाली नाठी
वृध्दाश्रम वाढले आहे फार
मुलांनीच मानली वृध्दांपुढे हार
काही ज्येष्ठामध्ये अॅटीट्युड असतो अती
मुले तरी समजून घेणार किती?
वागणे त्यांचे लहान मुलांचे
नवलच वाटते त्यांच्या हट्टाचे
दोन पिढीचं असतो जनरेशन गॅप
मुलाच्या डोक्याला होतो किती ताप
हॉटेलिंग,फिरण्याला त्यांची असते बंदी
सांगा मुलांना कधी मिळणार संधी
वृध्दाश्रमात ज्येष्ठ राहता
मुलानाच ठेवताच नावे
खरी परिस्थिती सर्वांनीच
तपासून घ्यावे
नविन पिढीचा
विचारांचा असतो एक कट्टा
ज्येष्ठांनी लावू नका त्यांना बट्टा
ज्येष्ठांनी करायला हवा
विचारांमध्ये बदल
मगच नवी पिढी समजलं
बघा कसे होतील
वृध्दाश्रम गायब
घरात ज्येष्ठांना
सगळेच म्हणतील साहेब