जिंकायच होतं
जिंकायच होतं
वेळ जात होती तस वय वाढत होतं,
समज येत होती तसं मन मरत होतं.
स्वतः सोडून सगळ्यांसाठी झटत होतं,
काय सांगू हाच आनंद पटत नव्हत.
भूक सोडून सगळ्या बाबतीत पोट भरत होतं, सगळं सरल तरी समाधान तेवढ होतं. अबोलपणाचं भूत वाढतच होतं,
ताठ मानेन मुंडकं कधीच टाकल होतं.
जाणवत होत की शर्यतीत टिकायच होतं, सगळ्यांसाठी का होईना उठायच होतं. पुन्हा एकदा जोमाने पळायच होतं, शेवटी जिंकायच म्हणजे जिंकायचच होतं.