ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
ऋतू बदलले
चैतन्य ओसरले
सगळं सगळं बदलले
गावच गावपण हरवले
झाडाचं हिरवेपण संपलं आणि
तिथं आलं डांबराचं जंगलपण
गावाबाहेरच्या मंदिरातला भजनाचा स्वर लोपला
आणि तिथं घुमू लागला डीजेचा गोंधळ
बांधावरची झाडं उलथून पडली
राहिलेल्या झाडांनाही नकोसे झालंय आपलं हिरवेपण
जिथं तिथं काँग्रेस गवतानी
आपलं साम्राज्य स्थापलंय
वेलीच्या रक्षणासाठी जागोजागी
तारेची कुंपणं आलीत
बांडगुळाची शेती बोकाळू लागलीय
रंगीबेरंगी रंगाचा गर्व असणारी
रानपाखरं आताशा त्यांचा आश्रय नाकारू लागलीयत
आणि भर म्हणूनच की काय
आभाळान आखडलीय माया
धरती झालीय सुकी
आणि गांधीजींचा ग्रामीण भारत
झालाय क्षीण...