गोड गोड बोला..
गोड गोड बोला..
कुणी कुणाला काही द्यावं घ्यावं
फारशी याची गरज नसते,
दिल घेतलेलं आठवणीत राहत नाही,
गोड अन आपुलकीने बोलण्याची अपेक्षा असते.
तिरस्कार रागराग केला बर
परतफेड देखील तशीच होणार
आपण नाहि आपुलकी दाखवली
तर आपणही माणुसकीला मुकणार
गोडगोड बोला माणुसकी दाखवा
हसतखेळत जगण्यानं
होईल दूर मनाचाही थकवा
