गेला
गेला
दिवस हा सरता, रात्र काळोखी भयाण शांतता
तरीही वाटे रात्र अपुरी, मन विचारात गुंतता
काय मिळालं अन किती सुटलं, शेवटी सगळा हिशेब मोजायचा
चांगलं असो की वाईट, चोख काय तो मिरवायचा
गिरवताना तेच पाढे, गल्लत होते कधी कधी
कितीही एकरूप व्हा कशाशी, मातीही देत नाही साथ साधी
सगळं सुटणार हे अटळ, मोह आवर घालत नाई
गेल्यावर सोडून सगळं काही, कुठेतरी नाव पुढे येई
कितीही समजा प्रयत्न करा, आहे काय ते आयुष्य
एवढी बाकी उरणार होती, तरी खर्च वाचवी मनुष्य
सरणावर ना पाही कोण स्वतःला, असा निरोप तो ठरलेला
काही किंमती फार उशिरा कळतात, जेव्हा कळतो तो गेलेला