एकदा काय झालं ..
एकदा काय झालं ..
एकदा काय झालं .. स्वप्नात माझ्या ती येऊन गेली
स्वप्नात येऊन मला म्हणाली, होतोस का रे माझा सखा?
देईल तुला रे छान- छान कथा आणि कविता.
मी म्हणालो जा तिकडचं, मला नको तुझ्या कधी नि कविता
का रे असे करतोस, मी कुठं जाऊ तुला सोडून?
तूच माझा रे सखा सोबती , मिळुनी दोघे करूया क्रांती.
नको तुझी क्रांती झोपू दे मला.. तुझी तूच कर हवी ती क्रांती ...
झोपेतच बडबडन ऐकून बायको माझी धावतच आली.
पुढचं कशाला विचारता नुसता राडाच झाला ...
बायको अशी कडाकडा भांडली , आधी मला सांगा
कोण ही कविता? कुठे भेटली सांगा अगोदर मला
मला अर्धवट झोपेमुळे काय झालं काहीच कळेना.
अगं तसं काही नाही ऐकून तर घे माझं, म्हणालो तरी
नुसती रडारड, गोंधळ धुसफुसत निघाली माहेराला
मी ही मग शक्कल लढवली. म्हटलं करूया थोडीशी गंमत
तिला मला जा तू माहेरी. मी कवितेलाच आणतो घरी.
मग मात्र ती गोड - गोडं बोलू लागली. अहो पण
एक शब्द बोलू नकोस, अगं संसार म्हणजे विश्वास
एकमेकांवर दृढ असावा लागतो तेव्हांच तो टिकतो
अगं स्वप्नात रमणारा मी (कवी) कधी प्रेमवेडा होतो?