छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज
होते खरे गरीबांचा आवाज
हितदक्ष राजा होते प्रजेचे
मायबाप होते गोरगरीबांचे
नको कुणी इथे उपाशी
हा ध्यास त्यांच्या मनाशी
बांधिलकी होती त्यांची रयतेशी
सर्वांचे जीवन सुखी ठेवण्याशी
शेतकरी राज्यात सुखी होता
मजूर आनंदाने जगत होता
अन्याय,अत्याचार होत नव्हता
सर्वांना न्याय समान होता
शिक्षणाची ज्ञान गंगा आणली
बहुजन त्यात शिकू लागली
मुलामुलींसाठी वस्तीगृहे बांधली
स्री पुरुष समानता दाखवून दिली
दुष्काळात तर तलाव बांधले
पाऊसाचे पाणी त्यात साठवले
विहीरी कालवे शेतात आणले
सारे शिवार जलमय केले
सारी शेते हिरवीगार झाली
शेतकरी पिढी सुखी नांदली
शाहू महाराजांनी किमया केली
शेतकरी मालाला किमत आली
कामगारही सुखी नांदत होता
बाराबलुतेदार गावात पोट भरत होता
शोषक,शोषितांचा सुळसुळाट नव्हता
दलालांचा इथे बाजार भरत नव्हता
संघर्षाची खरी लढाई जिंकली
अनेक संकटावर मात केली
समाजकार्य त्यांचे व्रत होते
जनमत सदैव पाठीशी होते
खंबीर नेतृत्व ,दूरदृष्टी शासक
खरे क्रांतीकारक,थोर समाजसेवक
थोर विचारवंत आणि प्रबोधनकार
महाराष्ट्र राज्याचे थोर शिल्पकार
पुरोगामी विचार,शुद्ध विचारसरणी
सर्वांची प्रगती हेच शाहूराजांचा मनी
साक्षर करून सर्व राज्यातील प्रजेला
ज्ञानाचा दिवा दिला अंधारमय मानवाला