भीड तंत्र
भीड तंत्र
लोकतंत्र, प्रजातंत्र, जनतंत्राला असते लोकमान्यता,
राज्यघटनेची नाही भिडतंत्रला अल्पशी मान्यता.
लोकशाहि मध्ये असते विचाराला मान्यता,
विरोधकांच्या मतांचीही घेतली जाते दक्षता.
राज्यघटने ने चालवायचे असते आपले लोकतंत्र,
असामाजिक तत्व कां मग वापरतात भिडतंत्र ?.
भिडतंत्र करते अभिव्यक्तिच्या विचारा वर आघात,
स्वस्थ लोकतंत्रा साठी भिडतंत्र आहे भयंकर आफत.
राज्यघटने भारतीय नागरिकाला दिले धार्मिक स्वातंत्र,
राजकिय सत्तेसाठी धर्माचा उपयोग नाही रास्त.
गौहत्या,लवजहाद आणी धर्मांत्तर नसावे राजकिय अस्त्र,
भिडतंत्रामुळे आपली लोकशाहि होणार नक्कीच निवस्त्र.
सभ्य भारतीय संस्कृति व लोकशाहि वर हा आहे वज्रघात,
भारतीय राज्यघटनला नागरिका कडुन अपेक्षित धर्मनिरपेक्षता.
गौहत्या,लवजहाद, धर्मांत्तर विषयी असणार जनतेचे दुमत,
पण घटनेला अपेक्षित आहे जनविचाराचे बहुमत.
असंवैधानिक विचाराने लोकतंत्र होनार कमकुवत,
आम जनतेने असंवैधानिक विचाराला करावे बहिष्कृत.