भारताचा इतिहास
भारताचा इतिहास
देश सोन्याचा होता माझा भारत नावाचा,
राजा हरीशचंद्राचा होता जिथला जन्म रामाचा
स्त्रीला अग्रक्रम देऊनी करी संताची सेवा,
निस्वार्थी लोक राहत होती श्री कृष्ण देवा
परप्रांतीय यवनांनी आक्रमण केले स्वार्थाचे,
विकृत मुघलांना जमीनित गाढायचे स्वप्न स्वराज्याचे
मंदीरी लुटली विनाश केला वेदान्तरूपी ज्ञानाचा,
शिश धडावेगळे झाल्यावरही लढला रक्षक अस्मीतेचा
रक्तपात करी जनतेचा शक्तीच्या जोरावरी,
यवनांची भिती दिसायची प्रतापाच्या भाल्यावरी
स्वार्थी लोक व्यापाराला आली मनी कामाचा होता भाव,
गोऱ्या रंगाच्या दैत्यानी माजवला होता उपद्रव
वस्त्र त्याग करुनी लढला फकीर नशिबाचा,
अल्पवयात शहीद झाला सैनिक स्वातंत्र्याचा
शौर्याचे मोठे बिज याच मातीत गाजले,
इंग्रजांना देखील यांच मातीने पाणी पाजले
एका कुविचाराने लागली होती देशाला चाळणी,
धर्माच्या आधारावर झाली धरेची फाळणी
धगधगत्या जखमीवर पुढान्यांनी मीठ चोळले,
भाषावार प्रांतरचनेचा विचार जेव्हा मांडले
अन्याय केला नागरीकांवर सत्तेत येण्यासाठी,
विकृत विचारांचा कार्यकर्ता बनवीला जयघोष देण्यासाठी