असाही पाऊस
असाही पाऊस
तो असा अवकाळी बरसून गेला
तो पाऊस होता सारे घेऊन गेला,
त्या भीषण रात्री अवचित घडले सारे
वाहून गेली माणसे आणि जनावरे....
त्या पावसाची रुद्र थयथय बघता
हतबल झाली निरपराधी जनता
वाहून गेली उभी आलेली पिकं,
डोळ्यात तून हाटेना पाणी
हिरावले सगळे सुख...
शेतकरी झाला निराधार तरी
वाचवले त्याने मूक प्राणी ....
केली निसर्गदेवतेची मनधरणी
आता नको कोपवू आभाळाला,
राख जरातर आमची लाज
तुला विनवणी पावसा...आज.
हिम्मत हरलो नाही
,पुन्हा उभारी घेऊ...
अजूनही खचलो नाही
नव्याने पीक पुन्हा लावू...
पाऊस कहर बनतो जेंव्हा....
धडा देऊन जातो पृथ्वीला,
जपावे निसर्ग ठेऊन भान
हीच खरी पृथ्वीची शान!