अभंग
अभंग
आतताई जीवं सत्तेचा भुकेला
जनतेचा केला नाश तेणे!!१!!
वाट्टेल ते करी सरकार दारी
ईश दरबारी नाश पावे!!२!!
हित आपुलालें ना कळे तयाशी
तेणे तो पायाशी धोंडा घेई!!३!!
जनते फसुन खुर्ची ते घेतली
गत काय झाली राम जाणे!!४!!
संतदास म्हणे माफ त्या करीन?,
जन जनार्दन वाट दावी!!५!!