आदर्श संविधान
आदर्श संविधान
भारताचे संविधान , डॉ. आंबेडकरांनी लिहिले
भारतमातेच्या शिरी , शिरपेचचि खोविले (1)
स्वातंत्र्योत्तर काळात , सर्वसमावेशकता
अवघडचि काम होते , लिहिणे अशी संहिता (2)
विद्वान , ज्ञानी , व्यासंगी , कीर्ती असे साहेबांची
समतोलपणे लिहिली , रचना संविधानाची (3)
मुलभूत हक्कांचे , विवेचन यात केले
कर्तव्यांची बाजूही , नमूद केली असे (4)
राज्यसरकार नि केंद्रशासन , व्यवस्थापनाचे
कायदे नमूद केले , संविधानामधे लोकशाहीचे (5)
राष्ट्रपती , उपराष्ट्रपती , पंतप्रधान , नियम नियुक्तीचे
कलमांमध्ये नमूद केले , ह्यांच्या निकष पात्रतेचे (6)
तळागाळातील लोकांचांही , सहानुभूतीने विचार केला
राखीव जागा ठेवून , तयांच्या विकासास वाव दिला (7)
अनेकविध बाजूंचा , बहुपेडी विचार , दूरदृष्टीने केला
भारतीय नागरिक वंदितो , भारतीय संविधानाला (8)
भारतीय नागरिकांनी संविधानासी , हक्काने मान द्यावा
पालन करुनी संविधानाचे , कर्तव्यास अग्रक्रम द्यावा (9)
अनंत उपकार संविधान कर्त्यांचे , मानिले भारतीयांनी
उपकार मनी स्मरताचि , ऊर येई अभिमानाने भरुनी (10)