STORYMIRROR

vanita shinde

Tragedy

4  

vanita shinde

Tragedy

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
276

किती कोसळला राजा

केले पाणीच रे पाणी,

पावसाने झाली सारी

वित्त जीवितही हानी.


नद्या भरल्या तुडूंब

आला त्यांना महापूर,

रुद्र रुपच घेऊन

जणू शिरे घरोघर.


किती रडावं ते आता

सांगा धाय मोकलूनी,

कुणी कुणाची सांगावी

काय वर्णावी कहाणी.


सान लेकरु कुशित

होतं शेवटच्या क्षणी,

गेली कायम झोपून

माय मिठीत घेवूनी.


गुरं हंबरुनी मेली

पिकं निजली शेतात,

जीव निष्पाप ते खूप

गेले पाण्यात वाहात.


होतं नव्हतं ते सारं

तरंगलं घरभर,

करुनिया अस्ताव्यस्त

किती मोडले संसार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy