५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस
५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस
एकाकी होता जीवन प्रवास
नव्हती कधी कुणाची साथ,
आयुष्य वाटायचे जेव्हा उदास
तेव्हा तू हाती, घेतलास हात.
जन्मोजन्मी साथ देण्याचे
वचनही मजला, तू दिलेस,
सुख दु:खांचे सोबती होत
मनात अलवार घर केलेस.
निराश होऊनी खचताना
धीर देऊनी, तू आवरलेस,
ओंजळ भरुनी मजवरी
आनंद सुमनांना उधळलेस.
नाही भासू दिलीस कधी
कसली उणीव, तू मजला,
तुझ्या सहवासानेच खरा
अर्थ जीवनास, या लाभला.
रुक्ष जीवनात येऊन तूच
रखरखणारे मन सावरलेस,
प्रित सुमनांचा वर्षाव करुनी
हृदय माझे, तू जिंकलेस.