वृक्ष
वृक्ष
कागदावरी लिहिले जाते चला वाचवू वृक्ष
सहजच आले ध्यानी आणि विचलित झाले लक्ष
वृक्ष तोडूनी कागद बनवून त्यावरती संदेश
याचमुळे तर आला अडचणीत आपला अवघा देश
जिथे मेळ ना कधीच दिसतो उक्ती आणि कृतीचा
तिथे ठाकतो प्रश्न उभा मग रोजच हा नीतीचा
उरेल जंगल कागदावरी भीषण भविष्यकाळ
अशीच आपण तोडत गेलो हिरवाईशी नाळ