विसरायचं म्हणटलं तरी
विसरायचं म्हणटलं तरी
विसरायचं म्हणटलं तरी
सगळंच कसं विसरता येत नाही
कितीही बरी झाली जखम
तरी व्रण मात्र जात जात नाही
जखमांवर मी माझ्या
अत्तराचा लेप दिला
नाव ना तिचे कुठे
फक्त फुलांचा सुवास दिला
ओठांना तंबीच अशी दिली
दुखाचे गाणेही ते हसून गालात
बेवफा म्हणु नका तिला
म्हणून दातही जीभेलाच चावतात
तीन विसरलं सगळ
विसरून जा म्हणून मला
कसं सांगू वेडीला
जगायचं सोड म्हणते मला
विसरायचं म्हणटलं तरी
असं सगळंच विसरता येत नाही
जिवापाड केलं प्रेम
असं अर्ध्यावर सोडता येत नाही