तु आणि मी
तु आणि मी
मैत्री तुझी आणि माझी
जगायला बळ देणारी,अडचणी मध्ये सोबत करणारी.
कायम पाठीशी राहनारी,हसवनारी ,खोट खोट रडवनारी,तरी ही सगळ्या नात्यां मध्ये सूंदर,आणि हवीहवीशी .
प्रत्येकाच्या मनात एक हळव नात असत.
कधी कधी ते रक्ताच्या नात्यां पेक्षा ही अनमोल असत.
ते म्हणजे मैत्रीच नात.
जो आपल मन जाणतो जो आधार देतो,तोच आपला जवळचा मित्र असतो.
आपल मन मोकळ करायला एक हक्काचा माणूस असावा लागतो .
मैत्री मध्ये जात,धर्म,याला अजिबात थारा नसतो .
मैत्री हे नात आपण निवडलेल असत म्हणूनच ते खुप सूंदर असत.
सुख दुखात कायम सोबत करत. अड़चणी च्या वेळी धावून येत.
मैत्रीत कुठलाच भेदभाव नसतो,तिथे फक्त स्वप्नाचे ,मैत्री चे भावविश्व साकारले जात.
मैत्री आयुष्यातील एक रूपेरी नात जे कधी ही झाकोळत नसते.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा ,गुण वेगळे पण मैत्री चा भाव एकच असतो.
आपला एकटेपना मित्रांच्या सहवासातच कमी करु शकतो.
मैत्रीत कुठलेच बंधन असत नाही. तिथे फक्त प्रेमच प्रेम असते.
मैत्री आपल्या आयुष्याला आकार देत असते.
नाजुक प्रसंगी सहजपणे विसावा घ्यायला एखादया मित्राचा खांदा हवा असतो.
काही चूकले तर चार शब्द सुनवायला मित्रच जवळ असावा लागतो.
आपले मित्र आपल्या जवळ आहेत किवा सोबत आहेत,ही भावना देखील जगायला बळ देते.
गरज पडेल तेव्हा हक्काने आवाज द्यावा,असे एकच नाते ते मैत्रीचे नाते.
मैत्री ही अनमोल असते,तिचे कशात नाही होऊ शकत मोल
मैत्रीचे नाते हे जगात आहे एकदम अनमोल.
मैत्री म्हणजे पिंपळाचे पान जे
जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायाला हवे.
नसतात इथे कसलेच हेवे आणि दावे.
मैत्री ही आजच्या धकाधकी च्या जीवनाला मिळालेले टॉनिक आहे,उत्साह वाढवनार,हसत ठेवनार,पुन्हा पुन्हा फुलवनार,अवघ आयुष्य इंद्रधनुषी बनवणार,!.
तुझी आणि माझी मैत्री जशी कृष्ण आणि सुदाम्याची जोडी.
आयुष्याला आली आहे तुझ्यामुळेच गोडी.