स्त्री
स्त्री
लग्नानंतर संपतात नाती सगळी स्त्री ची,
नंतर डोळ्यातले पाणी पुसण्यासाठी कुणी नसतं,
रडत जेव्हा काळीज स्त्रीचं,
सासरी तिला शांत करणारं कुणी नसतं,
सगळी नाती विसरून ती सगळ्याना आपलंसं करते,
प्रेमाने तिला धीर देणारं कुुणी नसतं,
प्रत्येक वेळी बोलणी ऐकून सहन करते,
सासरी तिच्या बाजूने बोलणारं कुणी नसतं,
बाहेरची असून पण सगळ्यांना आपलं मानते,
काय माहीत तिला की इथे तिचा जोडीदारसुद्धा तिचा नसतो
ही आहे एक स्त्री ची खरी कहाणी.