STORYMIRROR

Achyut Umarji

Tragedy

3  

Achyut Umarji

Tragedy

लग्न

लग्न

1 min
143

अन् ती ब्राह्मण होता होता राहिली...


साधारण १९८५चा काळ होता...

आता जसे प्रेम विवाह होतात...

तसा तो काळ नव्हता...

आता तर आंतरजातीय विवाह ही होतात...||१||


मी जात-पात नाही मानत...

त्या काळी मात्र...

ब्राह्मणांचा बोल-बाला होता...

संस्कारांचा प्रश्न होता...||२||


अश्यातच प्रत्येकाला निवडीचा अधिकार होता...

पण अरेंज मॅरेजचा जमाना होता...

आप आपल्या जातीत लग्न व्हायची...||३||


अश्यातच आम्ही सुद्धा प्रेम विवाह चा चंग बांधला...

मनापासून लग्न करायची इच्छा होती...

कुठं बिनसलं काही कळायच्या आत...

स्वप्नांचा चुराडा झाला...||४||


अन् स्वप्नातून जागे झाल्यागत झाले...

काळ १९८५चा होता...

अन् ती ब्राह्मण होता होता राहिली...

खंत आहे लग्न झाले नाही...

दुःख आहे एक होऊ शकलो नाही...।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy