कथा
कथा
धीरगंभीर रहायलाच हवं..
असं काहीच नसतं ,
आपल्यातलं मूल
नेहमीच लहान असतं !
थोडंसं हसलं तर..
नाव कुणी ठेवत नसतं ,
अडचणी सर्वांना येतात
पण गळायचं थोडी असतं ?
गेलेले क्षण येत नसतात..
हवे तसे घडत नसतात ,
वेळाकाळाच भान ठेवत
जगून तरी घेता येतात !
आला दिवस माझा..
कालचा होता बरा ,
उद्या..परवाचं सोडा
हा आजचाच दिवस खरा !
थांबायचं कुठे क्षणभर..
हे ही थोडं कळलं पाहिजे ,
त्यातली मजा मणभर
साठवत वळण वळलं पाहिजे !
आपापले प्रवास सांभाळत..
मार्गक्रमण करायचं असतं ,
पण नव्या रस्त्यावर जाताना
जुन्या दोस्तांना विसरायचं नसतं !
हसत..हसत का होईना..
दुःख हलकं करायचं असतं..
काहीच न बोलता मग ,
उगीच शांत रहायचं नसतं !
आपल्याच जीवन फूलावर..
फुलपाखरू आपणच व्हायचं असतं ,
आकाश कोणतही का असेना
इंद्रधनु तर आपणच व्हायचं असतं !
रोज काही लिहिण्यासाठी..
जुनं सारं पुसावंच लागतं ,
पुसता..पुसता लिहितानाच मग
नवीन आयुष्य कथेचा जन्म होतो
नवीन आयुष्य कथेचा जन्म होतो !