क्षण
क्षण
आयुष्यभर जगण्याचे अगणित
कण आपण वेचत असतो
हे वेचत असताना
किती तरी आनंदाचे क्षण
नकळत निसटून जातात
हे निसटलेले क्षण परत
मिळविण्याच्या नादात
"आजचा क्षण " हरवून जातो
मग या हरवलेल्या अनेक क्षणांना
कवटाळून दुःख करत बसतो.
एकदाच मिळालेले हे आयुष्य
सार्थ करण्यासाठी
येणारा प्रत्येक क्षण
काय घेऊन येतो,
काय देऊन जातो
याचा हिशेब ठेवण्यापेक्षा
तो क्षण मनसोक्त जगायचा असतो
प्रत्येक क्षणात जगण्याची
मौज असते, ती ज्याची त्यांनी
अनुभवायची असते.