खरं
खरं
आज मला एक ( खरं ) भेटलं,
विचारलं ओळखलस मला ?
मी खरं आहे, खरंच खरं आहे ,
नीट बघ खरं खरं म्हणतात मी तोच रे l
मी म्हणले खरंच खरं आहेस ?,
तू खरा आहे का नक्की ते सांग रे,
तू खोटं तर बोलत नाहियेस ना?l
आता माला विश्वास नाही उरला रे l
खरं आणि खोटं यात गुंतलो रे,
याच्या जाळ्यात आम्ही फसलोरे ,
तुझी ओळख आम्ही विसरलो रे ,
तुला ओळखन खूप कठीण झालंय रे l
खोटं खोटं आता यालाच सारे,
आम्हाला खरं खरं असे सांगतात रे,
आम्ही ही त्याला खरं मानू लागलो रे,
खरं, तुझी आता आम्ही ओळख विसरलो रे l
खोट्याला आम्ही खरं खरं ,
समजत आहे कारण आता,
खोटच खरं सांगत आमच्या ,
गळ्यात मारला जात आहे रे l
फळं खाऊन आरोग्य तर म्हणे,
खूप चांगले राहते हो ना ?,
आता फळ खाऊन सुध्धा,
माणसं किती मारतात रे ,
आम्हाला खूप फसवतात रे l
ताज्या भाज्या खाऊन ,
तब्येत चांगली रहाते ना रे ?
आता भाज्या खाऊन पण,
तब्येत तर खराब होतेच आहे ,
पण मोठे मोठे रोग ही होतात रे l
सर्वांमध्ये भेसळ ,केमिकल,
खोटं जगभर पसरले आहे रे ,
आता डोळेही खरं तुझी ओळख,
पारख करणे सुद्धा विसरले रे l
नवीन बिल्डींग कोसळतात रे,
नवीन पुल बांधले पडतात रे,
सुरक्षित म्हणून ठेवले दागिने,पैसे,
ब्यांका पण आता त्या बंद पडतात रे l
माणसंही चांगले समजून ,
कधी दगा देतात कळत नाही रे ,
अचानक कधी फसवतात रे ,
नंतर अमाचे डोळे उघडतात रे l
खरं प्रेम, खरे मित्र,मैत्रिणी,
सर्वच काही हरवलय आता रे,
तूच सांगणारे आता आम्ही ,
खरं तुला कसे ओळखायचे रे? l
खरं खरं करून कितीतरी,
विकणारे खोटं विकतात रे,
त्यांना त्याचे काही वाटत नाही,
खरं आता सारं विसरून चाललोय रे l
खोट यालाच आम्ही पण,
आता खरा मानु लागलोय रे,
खरंच तू खर हरावलास रे ,
तुला शोधणे खूप कठीण झाले रे l
खरं तुला कसं ओळखायचं ?
आम्हाला तूच शिकवणा रे ,
आणि तू पुन्हा येणा रे,आम्हाला,
तुझी खुप खुप गरज आहे रे l
खरं ना फळ,भाज्या राहिल्या,
खरी ना माणसं राहिली,ना नाती,
ना खर ते प्रेम ना ती माणुसकी,
खरं तुझी आता दुनिया संपली रे l
खरं तू पुन्हा नव्याने ये रे ,
तू आमच्याबरोबरच रहा रे ,
साऱ्या जगाला तुझी गरज आहे,
खर्याची दुनिया आता तुझ्याच हातात,
तु ती पुन्हा येऊन नव्याने बनवणा रे ll