काय झालं..!
काय झालं..!
काय झालं म्हणून
तीन मला विचार
काय सांगायचं
हे नाही मला कळाल
आमचा काळ वेगळा
आमची रीत वेगळी
चार चौघांन पासून
सार झाकून असायचं
एखादं गुलाबाचं फुल
पाना आडच दिसायचं
त्याच्या साठी मग
जन्मभर मरायचं
सारं कस मोजून मापून
चार हाताच्या अंतरावर असायचं
सूत जमून येता येता
तारुण्य टांगतीला लागायचं
मग त्यातून काटे चुकवत
एखादं फुल हाती लागायचं
ते पदरात पडे पर्यंत झुरायच
मग सर्व साक्षीनं बाशिंग बांधायचं
हल्ली तस नाही होत
याच मोठं अप्रूप वाटत
आपल्याला हे मिळालं नाही
म्हणून आजही काळीज फाटत
काल बघ ना प्रेमाचं
चांगलं प्रदर्शन थाटात पार पडलं
आणि आज पुन्हा गुलाबाचं
चांगलंच गुलकंदात रूपांतर झालं
नवा डाव नवी विट्टी
ना नात्याची पट्टी
ना मैत्रीची गट्टी
साऱ्यांचीच झाली सहज सुट्टी
वाईट वाटत ग अस पाहून
म्हणून मन मोकळं करतोय
यांना प्रेम कस काय कळत नाही
म्हणून प्रायश्चित घेतोय
बर झाल आपली सुटका
अग लवकर झाली
का कोण जाणे वाटते
यांची रीत नसती कळली....!!!
