गृहस्थआश्रम
गृहस्थआश्रम
असच एकदा विचार केला,
निघून जावे दुर कुठतरी.
घरच्यांच्या चेहरे बघता,
विचार निघून जाई.
गृहस्थाश्रमात मन नाही लागे,
शांती नियम धारुनी कृष्णवचनी सांगे.
जबाबदारी सोडून शांती नाही मिळणार,
अशांत मनाला परमात्मा कसा लाभणार.
भविष्य कसे घडवायचे वाढत्या महागाईच्या काळात,
परीवाराला कसं सावरायचे द्वेष निंदेच्या या संसारात.
असाच एकदा विचार केला मन दयावे भक्ती मार्गी,
आत्मा होईल शांती बुद्धी लागेल सन्मार्गी.