STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Classics

3  

Bhagyashri Chavan Patil

Classics

एक नवीन सुरुवात

एक नवीन सुरुवात

1 min
244

तुझं सारखं बदलत राहणं

नेहमी मला गप्प करत गेलं..


आणि मला नवीन प्रश्न नवीन विचार

सारखं सारखं पाडत गेलं..


तुझ्यापासून इतकं वेगळं केलं की

बोलले तरी आता रडु येतं..


इतका वेळ असतो की

समोरच्याला नं सांगता ही ओळखता येतं..


समोर दुःख वाढवून ठेवलं आहे

तरी उगाच मन तिथेच जावून पोहचत..


मला वाटतं जे सुरू झालं आहे

त्याचा शेवट ही चांगला व्हावा असं वाटतं..


नावापुरते नाती रोज बनतात दुरावतात

त्याचा फरक नाही पडत..


पण जे निभावलं जितकं होईल तितक केलं

मग तेच का अनुत्तरीत राहतं..


जगाचा नियम आहे एक गुंततो आणि दुसरा नाही

म्हणुनच पुढे जायचं दुःख त्यांच्याच नशिबी येतं..


कितीही सगळं छान आहे असं दाखवलं तरी

बदलेले स्वरूप नक्कीच लक्षात येतं..


उगाचच का त्रास होऊन ही मन परत परत

एकदा असं म्हणत तिथेच धाव घेत..


चूक वेळेची परिस्थीची असेल पण शेवटच 

जाताना होत ते खरं होतं हे तरी कळायला हवं होतं..


खुप खरी नाती माणसं ओळखता आली नाही

ती ओळखता आली नाही याचं वाईट वाटतं..


शेवटी प्रेम आहे तुझ्यावर केलेलं उगाच कसं

तुला हरवेन असं वाटतं..


पण काही भोग स्वतः भोगायचे असतात तरच

किंमत कळते कारण मी याच समाधान वाटलं होतं..


अर्ध्यावरती हात सोडला असता तर पुढचा प्रवास सोपा

झाला असता पण माझ्यातल मी पण तुझ्याजवळ राहिलं होतं..


उगाच कोणाला बांधून ठेवण्यात अर्थ नाही हे

कळायला स्वतःला सावरायला स्वतःला समजावंण जरुरी होतं..


कवितेशी परत गट्टी जमली सुरुवात जिथून झाली तिथेच

शेवटची कविता करून स्वतःला पुन्हा एकदा भेटायचं होतं..


जे गेलं ते माझं कधीच न्हवत कारण ज्याला माझं एकाकी पण

कळलं नाही त्याला अडकवणन बरोबर ही न्हवत..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics