बळीराजा
बळीराजा
काय केलं पाप
म्हणूनी बळीराजाला झाला ताप
निसर्गाला आली लहर
केला त्याने कहर
फाटलंं आभाळ
लावतो कुठे ठिगळ
खुप सोसली माझ्या बळीराजाने कळ
आता तुच दे देवा जगण्यास बळ
पोखरलं राजकारण
नेते उगाच लढायली विनाकारण
त्यात झालं या बळीराजाचं मरण
कधी संपेल याचं शोषण
म्हणून तर जवळ वाटायलं त्याला सरण
कधी मिळेल या बळीराजाच्या मालाला भाव
दलालंच करायली येथे काव-काव
साधायली आपला कुटील डाव
म्हणूनी मागतो मी समान नागरी कायदा
मगच होईल बळीराजाचा फायदा