बदलली माणसे आता
बदलली माणसे आता
इतिहास भूतकाळात संपला
तिथे तोल माणुसकीचा सुटला
बदलली माणसे आता क्षणाला
इथे आदर्शाचा सागर आटला
हरएक बाब स्वार्थाची योजना
पदोपदी फसवणे बिनधास्त
नसे वाली सत्याला कोणी कुठेच
झाला यात सत्याचा उघड अस्त
झाला फितुर,भरवसा दुर्दैव
नसे सुरक्षित रे आई बहीण
लटकला बळीराजा फासावर
आता जगणे दारिद्रय अर्थहीन
जातपात, पुढारी, राजकारण
मानव मानवातचं दुभंगला
हिच ती खरी किड मानवतेत
इथे कलंक जगण्याला लावला
नाही एकी नाही समंजसपणा
नको बदल कसलाच स्वस्तात
नसे घेणे न् देणे फक्त स्वस्वार्थ
आहे जो तो आपल्या अहंकारात
काळ बदलला पिढी बदलली
वेळेनुसार ज्ञान ही बदलले
ज्ञानानुसार तंत्रज्ञान वाढले
तंत्रज्ञानात संस्कृती विसरले
नवा काळ आधुनिक परंपरा
जगणे झाले मुके क्षणाक्षणाला
प्रतिष्ठेसाठी सतत उलाढाल
महत्व आहे फक्त ठक सत्तेला
पुन्हा घडेल का योग्य तो बदल
होईल जाणीव खऱ्या अस्तित्वाची
का हे असच चालू राहणार रे
समतेच्या छायेत झळ एकीची