यशोदा
यशोदा
अरेरे! किती वाई एखाद्या ल उठली.
एक दिवस साहेब नंदनच्या घरावरून जात होते. नंदनचे घर येताच त्यांनी गाडी थांबवून त्याची विचारपूस करायचे ठरवले व ते घरात आले. नंदनला खूप आनंद झाला. तेवढ्यात यशोदा कामावरून आली. त्यांनी तिला कामाबद्दल विचारले. तेव्हा तिने ही दैनिक मजूरीचे सांगितले. साहेब खूप रागावले. "अरे, काय केले मुकादम ने! तुला मी वेगळं काम दिलं होतं. हे असलं काम तुझ्यासाठी नव्हतं." तेव्हा यशोदाने पण मुकादमचे सगळे प्रताप सांगितले. त्याची बायकांकडे बघायची नजर, त्यांना कामाचे सगळे पैसे न देणं, काही बायकांना कामातून सवलत देणं, सगळं. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यामुळे साहेबांना मुकादमचा राग आला. त्याला काढून टाकायचा विचार त्यांच्या मनात आला. पण तो कंपनीतला खूप जुना माणूस होता, व त्याला पुराव्या शिवाय कसा काढायचा असा त्यांना प्रश्न पडला. तेव्हा यशोदा म्हणाली, "म्या देती तुम्हांसनी पुरावा ह्या दोन दिसात."
यशोदेला सगळं कळून चुकलं. ती संधीची वाटच पाहत होती व निशामुळे तिला ती आयती संधी साधून आली होती. तिच्या डोक्यात नामी कल्पना आली व ती लगेच अमलात आणायचे तिने ठरवले. तिने निशाला सांगितले, "निशे, म्या हाय तुझ्या पाठीशी. त्यासनी सांग, पैसे नाय परवडत द्यायला, अगं यशोदे, काय बोलतिया तू." "र करू नगस." असे बोलून यशोदा भरभर घरी जायला निघाली.
आलोच" असे सांगून मुकादम निघाला.
सगळ्याजणी निघाल्या पण तिची खास मैत्रीण निशा मात्र तिच्या सोबत राहिली. दोघी गप्पा मारत होत्या एवढ्यात मुकादम चहाचे दोन ग्लास घेऊन आला व एक यशोदेला दिला. "निशा, तू का नाही गेली घरी? आता तुला पण उशीर होईल ना?"
"बरं बाबा, घे माझ्यातला थोडा चहा" असे म्हणून मुकादमनातून तिचा जळफळाट होत होता.
मुकादम चहा पित होता पण त्याचा तिळपापड झाला होता. आज नामी संधी साधली होती पण निशा बयेने सारा घोटाळा केला. प्रत्येक बाईला पैसे देताना अंगठा लावायच्या वेळी तो त्यांचा हात धरायचा. त्या बायांना खूप राग यायचा पण नाईलाज होता. पण यशोदेचा हात त्याला धरता यायचा नाही. पहिल्या दिवशी बाकीच्या बायांप्रमाणे जेव्हा तो तिचा हात पकडायला लागला तेव्हा यशोदेने हात मागं सारला व म्हणाली, "साहेब पेन द्या की. म्या सई करते." तेव्हा तो चक्रावला होता.
तीन चार तिच्या डोक्यात येऊ लागले व तिचा जीव वर खाली होऊ लागला.
गार घ्यायचा व घरी जायचं.
पहिल्या दिवशी अंगठा लावण्यासाठी मुकादम तिचा हात धरू लागला तेव्हा तिने सांगितले, "साहेब, पेन द्या की, म्या सई करते", तेव्हा तो चक्रावला होता. तेव्हापासून तिचं मुकादमवर बारीक लक्ष होतं. "ह्यो मुकादम लई वंगाळ वागतुया. लई बेकार मानुस हाय", असं ती येताना घरी परतल्या व घरच्या कामात गुंतल्या.
पहिच्यापासून सावध रहा."
यकांना फसवतो हे तिला कळत होतं. काही जणींच्या कागदावर वेगळी मजूरी लिहितो आणि हातात वेगळं देतो हे तिच्या लक्षात आलं होतं. पण निशा ने सांगितले म्हणून ती गप्प राहिली. एकदा मोठे साहेब आले होते पैसे वाटत असताना, तेव्हा मुकादम जाम चपापला होता व यशोदा ने ते नीट हेरले होते. साहेब जुजबी बोलून लगेच गेले होते. मुकादमने कागदांची अदलाबदल केलेली यशोदाने बरोबर टिपली होती. "मेला लोकांच्या जीवावर मजा करतोया", असा मनात विचार येऊन तिचा जळफळाट झाला होता.
इथं घरी पण सगळं नीट चाललं होतं. नंदन स्वतः करता येतील तितकी कामं करून आजीला व यशोदाला मदत करत होता. यशोदा पण त्याच्यावर खुश होती. कधी कधी कामं उलटी सुलटी व्हायची, पण यशोदा त्याला समजून घायची. "दोन्ही पाय नसून बी किती कामं करतोया, मला मदत करतोया", असं ती आपल्या मैत्रिणींना सांगायची.
एक दिवस मुकादम ने यशोदाला कामानंतर थांबायला सांगितले. तिच्या बरोबर निशा पण थांबली होती. थोड्या वेळाने येऊन "साहेब आले नाहीत, म्हणून तुम्ही घरी जा" असं त्यांना सांगितले. एवढा वेळ फुकट गेल्याने दोघांची चिडचिड झाली होती. घरी येऊन पाहते तर सगळा गोंधळ झालेला. बी नाई मिलालं ला एकही शब्द न बोलता तो गप गुमान अश्रू पित राहिला. आतल्या आत कुढत राहिला. आपल्या नशिबाला दोष देत राहिला.
रात्रीची जेवणे आटोपली. तिची आवरा आवर होई पर्यंत कृष्णा नंदनच्या कुशीत झोपला होता. बरेच रक्त वाहून गेल्याने त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. त्याच्या गालाची पापी घ्यायला गेली तेव्हा तिचे लक्ष नंदनकडे गेले. तोही झोपी गेला होता. त्याचेही डोळे रडून सुजले होते.औषध आणून तिने त्याच्या हाताच्या बोटांना लावले व म्हणाली, "धनी, पुन्हा नाही चूकी करायचे म्या. लई वाईट झालंय. लई तरास दिला मी आज. समदं त्या मुकादमा पाई झालया. माझ्या देवावानी धन्याला खूप दुखावलं मी आज." असं म्हणून ती त्याला लहान मुलासारखे थोपटू लागली. पण मनात निश्चय केला, ह्या मुकादमाला धडा शिकवायचाच.
आता निशा पण मुकादमासमोर हांजी हांजी करत होती. तिची वागणूक पण बदलली होती. आता ती मुकादमाच्या मर्जीतली होती. तिला वेळेचे पण बंधन नव्हते. एवढ्या सगळ्या परिवर्तनाचे यशोदाला नवल वाटले. हळू हळू बाकीच्या बायकांकडून तिला कळले की मुकादमाच्या मर्जीतल्या बायकांना अशीच सवलत मिळते, व त्या बायका काम व पैशांकरिता त्याच्या म्हणण्या प्रमाणे वागतात. आता ह्या मुकादमला अद्दल घडवायची असे तिने मनाशी ठाम ठरवले.
तिने त्यांना आपण काय करणार व त्या जाळ्यात त्याला कसं पकडायचा ते सांगितले. साहेबांनी पण तिला परवानगी दिली. आपल्या कंपनीला बदनाम करणाऱ्या मुकादमला ते सोडणार नव्हते.
से. यशोदेने तिला सरळच विचारले, "काय निशे, ह्या दिसात घरला जायची लई घाई करते? मुकादमचं काम नसतं काय?" निशा नुसती चूप राहिली. काही बोलली नाही. तिचे डोळे पाण्याने भरले. यशोदेने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला दिलासा देत ती बोलली, "तू कशा पाई रडतेया? काय झालं?
निशाला रहावलं नाही. ती रडत रडत सांगायला लागली, "यशोदे, चुकलं माझं. म्या तुझं ऐकलं नाय. म्या नोकरी व पैश्याच्या जाळ्यांत फसले. मुकादम लई वाईट हाय. म्या तेच्याकडनं पैसे घेतले होते. सावकास परत कर, नाही केले तरी चालंल बोलला व्हता. पन आता तो तगादा लावतोया. पैसे दे आठ दिसात, नाही तर तेची इच्छा पुरी कर म्हनतोया." असे सांगून ती मोठ्याने रडायला लागली. यशोदेने तिला शांत केले व विचारले, "काय इच्छा पुरी कराया हवी हाय त्याची." "हलकट मेला, लई वंगाळ हाय साला. तेचा मुडदाच पाडतेया आता."
दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात झाली. जेवायच्या वेळेला यशोदेने सगळ्या बायांना कसे काय करायचे ते सांगितले. तेव्हा निशाचा जीव भांड्यात पडला. रात्रभर झोप उडाली होती तिची. तिला यशोदेचा खूप अभिमान वाटला व तसं तिने बोलून पण दाखवलं. जेवणे आटोपल्यावर परत सगळी आप आपल्या कामाला लागली.
बरोबर साडे पाच वाजता काम संपले. मुकादमने घाई घाईने सर्वांचे पैसे चुकते केले व सगळा गाशा गुंडाळुन तो लगबगीने आत गेला.
का? दुर्गा, काली की महिशासूर मर्दिनी? त्या पंधरा बायकांचे रौद्र रूप पाहुन ते सारे अवाक झाले होते. सगळ्या बायका मुकादमवर हात धुऊन घेत होत्या. मुकादम अर्धमेला झाला होता.
एवढा वेळ यशोदा बाजूला उभी राहून ते सारे दृष्य पाहत होती. मुकादम रक्त बंबाळ झाला होता.कांना थांबवळ पडले