विजयादशमी दसरा
विजयादशमी दसरा
विजयादशमी दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय नव्हे तर चांगल्या माणसानी मनातील राग, लोभ, मद,मत्सर यांवर मिळवलेला खरा तर विजय... म्हणूनच तो विजयादशमी...
प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला या जाळले... म्हणजेच त्यांनी रावणातल्या वाईट पणाला मारले रावणाला नाही...
लंकेचा राजा रावणाने लंकेला कधीही उपाशी ठेवले नाही... गरीब जनतेला दानधर्म करायचा. सर्व ग्रंथ,काव्यांचा त्याचा अभ्यास होता. ज्ञान पंडित होता.... भगवान शंकरांचा परमभक्त रावण होता....रावणा पेक्षा मोठा कोणताच भक्त नव्हता.
आणि त्याला राम अवतार भगवान शंकरांच्या हातून मरण आले.. यापेक्षा पुण्यवान शिवभक्त नाही.
सीता हरण केले पण तिला त्रास न देता सुरक्षित अशोक वाटिकेत ठेवले. स्रियांचा नेहमीच आदर करायचा.
तर अशा या रावणाला आपण जाळणारे आहोत तरी कोण?