कब्रस्थान रिटर्न -2
कब्रस्थान रिटर्न -2
कब्रस्थान मध्ये सायकल आणण्यासाठी वैभव गेला. कब्रस्थान चे ते गेट त्या रात्रीच्या झाडाझुडपात एकदम भयानक वाटत होते... झाडावर उलटी लटक लेली वटवाघळे आणि ते तीक्ष्ण नजरेने पाहत असलेले घुबड त्या रात्री अगदी भयावह वाटत होते.
वैभव ने त्याच्या मित्रांना ही बोलावले.... आज त्या जे कोणी असेल चुड़ैल, आत्मा आज त्याचा फायनल हिशेब करुनच आज जायचे.... सायकल घेऊन.... अशी प्रतिज्ञा केली आणि तो मित्रांना घेऊन मोहीम वर निघाला...
हळूहळू चालत चालत ते आता आतमध्ये गेले... सळसळत असलेल्या पानांचा आवाज भयावह वाटत होते.... वैभव त्या झाडाजवळ पोहोचला.... सायकल झाडाला वेलींनी लटकलेली होती.... वैभव चे मित्र वैभव ला त्या झाडापासून लांब राहण्यासाठी सांगत होते....
वैभव ने त्यांचे ऐकलं नाही आणि म्हणाला... अरे काय मर्दांनो... भुताला, हडळीला, पिशाच्च ला घाबरला... अरे काय पळता मागे... तुमच्या मित्राची सायकल इथे अडकून पडली... आणि तुम्ही पळताय व्हय इथनं.... हीच का तुमची मर्दानगी लेकहो. आज आपण नाही मागे फिरायचे इथनं... त्या पिशाच्चाला यमसदनी धाडायचे.... चला आता... विशाल गौरव आणि आकाश तिघे ही वैभव सोबत निघाले... तिघांनीही मशाली हाती घेतल्या... रात्रीच्या अंधारात ती पेटती मशाल मार्ग मोकळा करून देत होती.... तेवढ्यात मागुन आवाज आला ट्रिंग ट्रिंग....
आता विशाल आणि गौरव पुरते घाबरले... वैभव मात्र सायकल घेण्यासाठी त्या झाडाजवळ पोहोचला.... भुत, पिशाच्च च्या खूप गोष्टी त्या नी ऐकल्या होत्या.... खूप दिवसांची इच्छा होती पिशाच्च पहायचे....
आता त्याला सुट्टी नाय, त्याला एका बुक्कीतच गाडून टाकू....
मागच्या वेळेस तो साधा भोळा वैभव होता.... आता नाही... आता हा वैभव हनुमानाचा भक्त आहे.... तसा तो मनात जाप करु लागला.....
सब सुख लहै , तुम्हारी शरना
तुम रक्षक हो काहू को डरना
भुत प्रेत निकट नहीं आवे
महावीर जब नाम सुनावे...
त्याने पंचमुखी हनुमान कवच बाहेर काढले..... त्या हनुमान कवचाची शक्ति इतकी होती की... ते पिशाच्च त्याच्या जवळ येऊ शकले नाही.....
माझी सायकल सोड.... ते पिशाच्च वैभव ला दिसत होते. सायकल सोड... तेवढ्यात ते पिशाच्च वैभव वर धावून आले पण हनुमान कवचाची ताकद एवढी होती की ते काहीही करू शकले नाही... आणि ते पिशाच्च त्या कवचाच्या ताकदीने प्रृथ्वी च्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर गेले....
वैभव आता निघणार तोच परत ट्रिंग ट्रिंग आवाज आला....
कोण आहेस तु, काय हवय तुला, का परत आलीस इथे....
तेवढ्यात ते पिशाच्च रडु लागले.... सांगते... मी एका राज्याची राणी होते.... ब्रिटिश सरकारने माझे राज्य हडपण्यासाठी माझ्या वर खूप अत्याचार व जोर जबरदस्ती केली.... मला तुरुंगवास ही झाला... पन मी माझे राज्य दिले नाही तर त्यांनी मला रात्री जिवंत जाळून टाकले आणि या कब्रस्थानात मला अर्ध नग्न अवस्थेत गाडले.... आजही ती नराधम लोक आहेत....
माझ्या सारख्या कित्येक स्त्रियांवर आज अन्याय होतोय.... त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठीच मी परत आलेय..... ते पिशाच्च आता त्याच्या पुर्व जन्मात गेले.... त्या नराधम राजांना व त्या जेलर अधिकाऱ्यांला तीने तसेच जिवंत जाळले... आणि राजाला तडफडून तडफडून मारले..... तिचा तो बदला आता कायमस्वरूपीचा संपला होता..... ती बदला पुर्ण झाल्यावर जोरात ओरडली..... तिला आता मोक्ष मिळाला होता.....
त्या पिशाच्चाने वैभव चे आभार मानले.... ते पिशाच्च म्हणाले.... आज खऱ्या अर्थाने अन्यायाचा विनाश झाला....
आणि खऱ्या अर्थाने एक विनंती... आज जो पन स्त्रीवर हात टाकेल त्याची डायरेक्ट कबर खोदली जाईल.....
त्या पिशाच्चावर आता योग्य रीतीने अंतिम संस्कार केले आणि वैभव आणि त्याचे मित्र सायकल घेऊन त्या कब्रस्थानमधून बाहेर पडले.......
आजही आम्ही त्या कब्रस्थानात जातो... हा प्रसंग आठवला की डोळ्यांत मात्र अश्रू येतात...
जय श्री राम