जनी - भाग ९
जनी - भाग ९
राजेश ला आईचा फोन आला अर्जन्ट घरि ये : ......! त्याला वाटले परत वडिलांची तब्बेत .... ?)
राजेश अतिशय घाबरलेल्या स्थितील ऑफिस मधून निघाला . सर्व स्टॉप पण घाबरला होता .. सर्वानां वाटले कि त्याचे वडिल : ??? मात्र स्पष्ट कोणी बोलत नव्हते राजेश घरि आल्यावर प्रथम वडिलांच्या रूम कडे धावत गेला . वडीलांना सुखरूप बघून राजुच्या जिवात जिव आला मात्र ? त्याची अशी परिस्थिती बघितल्यानंतर वडिलांनी त्याला विचारले काय झाले .? का घाबरला आहेस . कारण त्याबद्दल वडिलांना काही माहिती नव्हते . राजे श ची आई खाली हॉलमध्ये त्याच्या वडिलांना कॉपी करण्यासाठी गेली होती . तोपर्यंत राजेश वडिलांच्या रूम मध्ये गेला होता परत धावत जाऊन आईकडे गेल्यावर घडलेली हकिगत व कारण विचारले तेव्हा तिने सांगितले एक आनंदाची बातमी सांगायची आहे तिने घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवले व आनंदाने सांगितले की राजेश : ! तुला तुझ्या पसंत तिच्या मुली बरोबर लग्न करण्यास तुझ्या वडिलांनी परवानगी दिली आहे . तेव्हा मात्र राजेश ला खूप आनंद झाला . आता मात्र त्याला हि गोड बातमी जनीला देणे आवश्यक होते त्यासाठी तो तसाच धावत सुटला . होस्टेल कडे मात्र काही वेळाने त्याला कळाले ? सध्या कॉलेज चालू असल्यामुळे ही कॉलेजला असेल म्हणून तो रस्त्यातून गाडी परत कॉलेज कडे वळवली मात्र कॉलेजमध्ये लेक्चर चालू असल्यामुळे तो गेटवर जाऊन थांबला . फोन ट्राय करू लागला फोन लागत नव्हता .. साधारणतः अर्धा तासाने फोनची रिंग वाजली व त्याने जनीला फोन केला . अर्जंट कॉलेजच्या गेट मध्ये ये ! तेव्हा मात्र जनी 'ला याचा धक्का बसला . तिला वाटले वडिलांच काही ... ? तर झाले नाही ना . असे म्हणून ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत तिच्या मैत्रिणींना घेऊन ताबडतोब गेट कडे धावत आली तेव्हा तिचा चेहरा बघण्या सारखा झाला होता . तेव्हा राजेश निवांत गाडीजवळ उभा दिसला . तिला थोडेसे बरे वाटले त्या आनंदाच्या भरात त्याने सर्व मुलींच्या ग्रुप मध्ये जाऊन जनी ला मिठी मारली . सर्व मैत्रिणी त्यांचे कडे आचर्याने बघत च राहिल्या ? आता लगेच घरि चल ... त्याने सर्व मैत्रिणींना सांगितले की माझ्या वडिलांची तब्येत अतिशय चांगली असून त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे . आनंदाची बातमी : : : : ..! सांगण्यासाठी येथे आलेला आहे . तेव्हा राजेशने सर्वांना हॉटेलमध्ये येण्याची विनंती केली व सर्व मित्र-मैत्रिणींना राजेशने जंगी पार्टी दिली . कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सर्वांसमोर राजेशने जनीला प्रपोज केले 💐💐 ही बातमी म्हणता म्हणता सगळ्या कॉलेजमध्ये पसरली जेनीला ही फार आनंद झाला होता मात्र तिच्या मनामध्ये शंका येत होती . की आपण एक अनाथ मुलगी असून सुद्धा मोठ्या श्रीमंत घरामध्ये आपला निभाव लागेल का ? इतर नातेवाईक मंडळी आपल्याला समजून घेतील काय ?? आपल्या मनाचा कोंडमारा होणार नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध काही घडणार नाही ना . याबद्दल तिच्या मनामध्ये येत होते . मनात शंका निर्माण झाली होती . या आनंदाच्या भरात राजेशने जेनीला घरी येण्याची विनंती केली .. मी नंतर येईल सांगून वेळ निभावून नेली कारण तिला कोणताही निर्णय घाई गडबडीत घेणे चांगले वाटत नव्हते . त्यामुळे तिने उद्या येईन असे सांगून राजेशला सांगितले . ही बातमी हळूहळू मैत्रिणी मार्फत मोनाला पोचली . मोना ही याच गावांमध्ये ज्या मित्राशी लग्न केले होते व तो मित्र हळूहळू राजे चा मित्र झाला होता व त्याने हळू हळू कंपनीमध्ये राजेश प्रमाणे प्रमोशन घेतले होते त्याची मुलगी आणि मोना त्यांचा संसार चालु होता . मात्र मोनाची मुलगी होस्टेल मध्ये :! तिला मिळालेल्या पराक्रमाचा फळ ! तिच्या त्या मुलीला जनी ज्या होस्टेलमध्ये राहत होती त्या होस्टेलमध्ये रवानगी केलेली होती .मात्र ती एक बेवारस अपत्य म्हणून ! मात्र ती च्या अंतरी असणारे प्रेम ,वाच्छल्य , ममता , आईचे प्रेम हे मनाला पुन्हा पुन्हा होस्टेलमध्ये कोणते ना कोणत्या कारणाने ती त्या होस्टेलमध्ये असणार्या मुलीला भेटत होती . करण लाई माहिती होती मात्र करण चा काही संबंध नसल्यामुळे व आता जवळ जवळ एक वर्ष होत आले होते त्यामुळे ती मुलगी प्रत्यक्ष करण ओळखू शकत नव्हता . तो विसरून गेला होता . मात्र पुन्हा एक शंकेची पाल चुकचुकत होती की माझ्या मुली पेक्षा होस्टेलमध्ये सोडलेल्या मुलीकडे जास्त आकर्षित होत असते .तेव्हा मात्र त्याच्या मुली विषयी ची प्रेम आणि सख्या आईचे प्रेम यामध्ये कमतरता दिसून येत होत .तेव्हा मात्र त्याच्यामध्ये खटके उडत होते .इकडे करण हा स्वतःच्या अपत्यासाठी प्रयत्न करीत होता . मात्र डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते की तो स्वतः बाप होऊ शकणार नाही . व त्याने मोनाशी लग्न केले होते . आपला वंश वाढावा . वंश चालू असावा हीच आई-वडिलांची इच्छा असल्यामुळे त्याने परत मोनाशी विवाह केला होता . आपल्या स्वतःच्या मुली चा पण सांभाळ होईल तिला आईचे प्रेम मिळेल व आपल्या आई-वडिलांना वंशाचा दिवा .....! मिळेल या अपेक्षेने तो अतिशय आनंदात होता मात्र डॉक्टरांच्या सांगण्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली . कित्येक दिवस प्रयत्न करून सुद्धा यश येत नव्हते . त्यामुळे करण चिडचिड करू लागला . मोनाला संसारामध्ये रुची नव्हती नव्हती . तिचे एकच स्वप्न होते ते म्हणजे जनी 'चा संसार उध्वस्त करणे त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते . मात्र नीयतीने ठरवून दिलेल्या गोष्टी पुढे जाता येत नाही .याची तिला कल्पना नव्हती . आणि अशाच एका प्लॅन साठी ती तिच्या मित्रांसमवेत एका गार्डनमध्ये जनीचे लग्नाविषयी सर्व गोष्टींचा खुलासा करून त्यांना सांगितले की कोणत्याही प्रकारे प हे लग्न होता कामा नये .. त्या साठी तिने अनेक प्रकारच्या योजना मित्रांना सांगितल्या . आणि त्याप्रमाणे ते कामाला लागले होते इकडे मात्र राजेश हा श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा . असल्यामुळे त्याच्या वडिलांनी चा पुनर्जन्म झाल्यामुळे स्वतःचे मुलाचे लग्न एका राजेशाही पद्धतीने , धूमधडाक्यात व्हावे . तिकडे जनी ची परीक्षा जवळ आल्यामुळे तीन महिन्याची मूदत तीच्याकडे होती .या तीन महिन्यांमध्ये आवश्यक ती सर्व तयारी तीही मनापासून मैत्रीण समवेत तयारी करीत असतानाच एके दिवशी काही कामानिमित्त जनी बाहेर पडली असता रस्त्यामध्ये एक कार येऊन उभी राहिली .. ! आणि त्या कार मधून दोन धिप्पाड रेडे बंदुकीचा धाक दाखवून... तीला गाडीत बसण्याच साठी .. सांगत होते . आणि अचानक.....!!?!?!
(क्रमशः)