अदृश्य कवीचा निरोप
अदृश्य कवीचा निरोप
आज त्याने शेवटचे लिखाण लिहले. कदाचित ते शेवटचे नसावे. ते लिखाण त्याच्या श्वासांप्रमाणेच आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ते संपणार नाही. कोणी लेखक म्हणत. तर कोणी कवी , कवीराज तर कोणी स्वार्थी तर कोणी चित्रकार , विदुषक, गायक तर काही लोक येडा म्हणत तर कोणी साधा चहा सुद्धा विचारत नसत. तो कोण आहे किंवा नाही याची काही जणांना काही पडलेलीच नव्हती. या कला त्याला जन्मजातच होत्या.
तो त्याला जे आवडल ते तो करत असे. 1990 मध्ये पेन हातात घेतला आणि एक वही घेतली त्यात तो प्रत्येक दिवसाची आठवण रहावी म्हणून दिनक्रम लिहीत , चित्र काढत, चित्रपट कथा लिहीत. आजही त्या आठवणी ताज्या आहेत पण तो नाहीये..... कारण तो कोणालाच माहिती नाही.... सगळे त्याला विसरून गेले आहेत.
सुरुवात तर केली पण त्याच नाव माहिती नाही.... त्याने अदृश्य निरोप घेतला.....