विषय:- निसर्गाची अमुल्य ठेव
विषय:- निसर्गाची अमुल्य ठेव
रंग सुंदर निसर्गाचे सा-यांना
कसे अनोखे वेड लावतात |
रंग मानव दाखवून स्वभावातनं
निसर्गातील वृक्षांना कापतात | |१| |
वेड लागले मला निसर्गाचे
देई सौख्य समाधान दृष्टीस
वेड लागले कृतघ्न मानवास
ओरबाडून घेऊ पाहे सृष्टीस | | २| |
ठेव निष्ठा जरा तरी करी जतन
निसर्गाचे या सृष्टीच्या भल्यासाठी
ठेव दिली अमुल्य निसर्गाने कराया
सांभाळ नको लागू भलत्यापाठी | |३| |
वाट वळणा वळणाची नागमोडी
जाई हिरव्या डोंगर दरीच्या मधून |
वाट पाहे सृष्टी सारी निसर्गाच्या
संतुलनाची मानवा घे समजून | |४
मान द्यावा निसर्गाला ठेवून भान
देतो किती आपणास भरभरून |
मान तुकवाया नको भविष्यातील
भीतीने ये अंगावर काटा सरसरुन | |५| |
वरील शामलाक्षरी काव्य प्रकारात रचना करताना निसर्गाची ठेव जतन करून मानवाने सृष्टीच्या संतुलनासाठी वृक्षांची तोड करू नये हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे!