*विषय:- मोबाईल*
*विषय:- मोबाईल*
काय आला मोबाईल बाई झाली
डोकेदुखी सर्वांना कळेना काही |
मोबाईलच्या अतीवापरावर इलाज
काही केल्या सापडतच नाही | |१| |
मोबाईल ने सा-याच जगावर
केलंय काय इतकं हे गारुड |
अगं विंचू चावला सारखंच संत
एकनाथांचं होईल रचून भारुड | |२| |
मोबाईल आला हाती विसरले
सारे पुस्तक वाचन वर्तमानपत्र |
विसरले पत्रलेखन,मैदानी खेळ
अन् मोकळ्या गप्पांचे चर्चासत्र | |३| |
मोबाईलनं लहान मुलांना भयंकर
केलं वेड जेवतांना असतात बघत |
अस्पष्ट दिसणं,अती वजन वाढणं
मोबाईलच्या वापरामुळे सतत | |४| |
मोठ्यांचा तर तो जीव कि प्राण
झालाय त्याच्यावीण तो अपूर्ण |
हरवत चालली आहे संपूर्ण पिढी
करते आहे मनःशांतीचे चूर्ण | |५| |
आधुनिक युगात त्याचा महिमा
वाढलाय खूप हे ही तितकेच खरे |
माफक प्रमाणात मोबाईल वापरच
भविष्यासाठी फायद्याचा बरे | | ६| |
मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम सांगतांना त्याचा माफक प्रमाणात वापरच भविष्यात सा-या जगासाठी फायदेशीर ठरेल हेच विचार या कवितेतून व्यक्त केले आहे!