STORYMIRROR

Meera Mahendrakar

Tragedy

3  

Meera Mahendrakar

Tragedy

वाद

वाद

1 min
127

कोर्टाच्या पायरी शहाण्या माणसांनी चढू नये म्हणतात 

तरिही वाद मिटविण्यासाठी नको ते आवुर्जून करतात 


मुळात वाद करण्यासारखे व्यवहार असतातच कशाला

कृतीपेक्षा बोलण्यात वेळ घालवतात कशाला 


वादात सहनशक्तीपेक्षा आकलनशक्ती वाढवली पहिजे

समजविण्यापेक्षा समजण्याकडे भर दिला पाहिजे


ठरलीच असेल एखादी गोष्ट मनापासून तर ठाम रहा

वायफळ बोलण्यात व धमकविण्यापासून सतत दुर रहा


कारण वादात फक्त वेळ व ऊर्जा वाया जाते

समस्या सोडवता येत नाही उलट ती वाढत जाते 


 ओरडून रागावून प्रश्न सोडवता येतो का कधी?

थोडे शांत राहुन वेळ देण्याची गोष्ट आहे ही साधी


छोटसंच पण सुंदर आयुष्य माणसाच असत

चुकिच्या गोष्टीत ते वाया घालवायाच नसतं 


चांगल्या गोष्टी करता आल्या तर करु काही 

कारण हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणे नाही



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy