समानतेचे हक्क
समानतेचे हक्क
26 नोव्हेंबर 1949 रोजी l
आपले संविधान अस्तित्वात आले ll
त्यानुसार भारतीय नागरिक l
जगण्यास निश्चिंत झाले ll
कलम 14 नमूद झाली l
कायदेशीर समानता सर्वांस मिळाली ll
धर्म वंश जात लिंग भेदभाव हे संपुष्टात आले l
याचे आधारस्तंभ कलम नंबर 15 झाले ll
कलम 16 उदयास आली l
समान संधी प्राप्त झाली ll
17वी कलम जेव्हा बनली l
अस्पृश्यतेच्या कनपटात पडली ll
18 व्या कलमाचे निर्माण झाले l
स्वार्थी पदव्या संपवून टाकले ll
गरीब-श्रीमंत समान झाले l
घरोघरी शिक्षण नांदले ll
संविधानाने हेच हक्क नागरिकांस बहाल केली l
समतेचे जन्म झाले असमानता खड्ड्यात गेली ll
