नरवीर तानाजी
नरवीर तानाजी
१६२६ ला गोडवलीत नरसिंह जन्मला
काळोजी मालुसरेंचा अभिमान ठरला
सेनापती स्वराज्याच्या सेनेचा शोभला
सवंगडी त्यास शिवरायांसारखा भेटला
स्वराज्यस्थापनेत राजांना सहाय्य केले
गोडवली गावातच बालपण त्याचे गेले
डोंगरदऱ्यांना त्याने जवळूनच जाणले
वडीलांच्या मृत्युचे दु:ख त्याने साहीले
शेलारमामांकडे ऊंबरठला प्रयाण केले
महाराजांनी दंगलग्रस्तांचे काम सोपवले
तानाजीने होते ते कसोशीने पार पाडले
उमरठवासीही स्वराज्यकार्यात सामावले
फेब्रुवारी १६७० ला मोठी चकमक झाली
ऊदयभान आणी तानाजीची लढाई झाली
किल्ल्यावर जाण्यास घोरपड कामी आली
मावळे अन् पहारेकऱ्यांत धुमश्चक्री उडाली
ऊदयभानने वार तानाजीच्या हातावर केला
तुटलेल्या हातावरती बांधला तानाजीने शेला
अखेरपर्यंत तानाजी कोंढाण्यासाठीच लढला
४ फेब्रुवारी१६७०ला गड आला पण सिंह गेला
=============================