निरोप
निरोप
तू निरोप घेतलास तेव्हा
भिंतींशिवाय कुणीच नव्हतं
ना साक्षीदार ना सोबती,
तुलाही अन मलाही!!
तू निघालाच होतास
महायात्रेवर ,
मग मी बापडी
थांबवणार कशी ?
किमान एक दुसरा खांदा
मला रडायला असेल
अशीही वेळ नव्हती ,तुझ्या जाण्याची
कसली शिक्षा दिली असेल नियतीने
तुला व मला अन आपल्या प्रेमाला!
ती वेळ टळायला हवी होती रे!