नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रभावी विचार, तेजस्वी वकृत्व
लढाऊ बाणा नेताजी होते वादळी व्यक्तिमत्व
कटक मध्ये जन्म झाला
आई प्रभावती, वडील जानकीनाथ
शहरातील वकील होते नामवंत
सुभाषचंद्रांनी ही त्यांच्यापासून
प्रेरणा मिळाली झाले ते यशवंत अन् किर्तीवंत
कठोर परिश्रम, अद्भुत साहस,अलौकिक अशी देशभक्ती
"कर्म हेच आपल कर्तव्य, कार्य करण्याचा आपल्याला केवळ अधिकार हे शिकविले,
अंगी संचारत होती ज्यांच्या दुर्दम्य अशी इच्छाशक्ती
"जय हिंद "हा नारा
प्रथम दिला बनला
भारताचा राष्ट्रीय नारा
"तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला
जमवून शूरवीर मातृभूमीच्या सुपुत्रांना हादरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला
"आझाद हिंद सेनेची" केली स्थापना
स्त्री सैनिकांचे "झाशीची राणी" नावाचे पथके उभारून
सर्वशक्तीनिशी इंग्रजांशी लढले
स्वातंत्र्याचे खरे उपासक नेताजी ठरले
भारतभूमीचा एक तळपता सूर्य
ज्यांचा होता संघर्षमय प्रवास
थोर स्वातंत्र्यसेनानी,पराक्रमी
स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणाऱ्या
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हृदयापासून माझा सलाम