माणूस झाला बाहुली
माणूस झाला बाहुली
उद्योगांची झाली प्रगती
औद्योगीकरण वाढले.
धूर प्रदूषण, प्रदूषित पाणी,
जगणेही मुश्किल झाले (१).
विनावप्रक्रिया दूषित पाणी,
गटार गंगा नदीत जाते.
काठावर ली गावे, वस्ती,
शेतीभाती दूषित होते (२).
मूलभूत हककांची आमुच्या
रोजच होते पायमल्ली.
हिरवा पाऊस, निळी नदी,
उघडी झाकणे गल्लो गल्ली (३).
जगणे, मरणे आमुचे
आता प्रदूषणाची ठरविलं पातळी.
रक्त नासले, श्वास कोंडले,
माणूस निर्जीव असे बाहुली (४).