माझं गाव
माझं गाव
माझं गाव म्हणून
लोक गावा बाहेरच मिरवतात
एक गाव बारा भानगडी
हे मात्र नेमकं विसरतात
गावानं हाकलल म्हणून
गावा बाहेर पडतात
मनातल्या मनात सदा
गावाच्या नावाने खडे फोडतात
बाराच गाव असत
हे ते पुरतं जाणतात
गावाच नाव काढलं की
मग शिव्या शाप झोडतात
कौतुक असत मनात
म्हणून तर गावाचं
भल सदा चिंततात
आणि वेळ येता अंग बाजूला काढतात
गावानं लाथाडल तरी
गावावरच प्रेम करतात
गावा कडची महती
मोठ्या दिमाखात सांगतात
आपल्या देशात हीच
परिस्तिथी सर्वत्र दिसते
कारण प्रामाणिक माणसांची
संख्याच कमी असते
अशी मोजकी माणसं
गाव सोडून जातात
बेईमान लोकांना कायमचा
राम राम ठोकतात
ओळख गावाची लपवून
आनंदात जीवन जगतात
तेंव्हा मात्र पोटशूळ माणस
सावली होऊन येतात
सुखा समाधानाचं जीणं
त्यांचं इतिहास सांगून बरबाद करतात
कारण सत्य मागे उभे राहण्या आधीच
असत्याला गावभर फिरवून आणतात
द्वेष करणारी माणसं
अफवा माघारी पेरतात
मूर्ख माणसं ती पसरवत फिरतात
अती मूर्ख माणसं त्यावर विश्वास ठेवतात
असच जीवनात होत असत
म्हणून गाव म्हंटल ही
भल्या भल्यांच्या अंगावर काटा येतो
इज्जती साठी तो गाव नको म्हणतो
अस गाव बाबा शत्रुलाही
कधी स्वप्नात सुद्धा मिळू नये
चार खांदे अन एका मडक्यासाठी
प्रामाणिकपणाची फाशी कधी लागू नये
नशीब एकेकाच बकवत्तर असत
गेल्यानंतर गावाचं नाव जगा कळत
अप्रामाणिक पणाच मड जेंव्हा
गावाच्या वेशीबाहेर सुखाने जळतं....!!!