किनार्यावरून चालताना
किनार्यावरून चालताना
किनार्यावरून चालताना,
वाळूमध्ये भिजलेले ते पाय,
मागे पाऊलखुणा ठेवायचे.
सागराशी एकरूप होऊन गेलेल्या मनांला,
त्याचे भान चं नसायचे..
किनार्यावरून चालताना,
मागे उमटलेल्या त्या पाऊलखुणा,
क्षणार्धात नाहीशा व्हायच्या.
कारण त्या लाटांना ही तेव्हा,
सागराला भिडण्याची ओढ असायची...