हरवले ते क्षण
हरवले ते क्षण
आठवण मला त्या दिवसांची
रोज येते
आठवून सारे काही
पुन्हा लहान होते
इथेच रोज येणे
इथेच खेळणे होते
हरवले बालपणीचे क्षण
इथेच शोधतं होते
किती तो काळ सुखाचा
प्रेमळ होता
आज दुष्काळ झाला आहे
माणुसकी वजा माणसांंचा
आज हा काळ आहे
