STORYMIRROR

Medha Desai

Tragedy Others

4  

Medha Desai

Tragedy Others

दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ

दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ

1 min
408

माणसाच्या संघर्षमय जीवनात

नेहमी सुखदुःखे दडलेली

त्यामुळे संकंटांवर मात करण्याची

सवय त्याच्या अंगवळणी पडलेली १


नैसर्गिक आपत्ती म्हटल्यावर

तिथे कुणाचेच काही चालत नाही

दुष्काळ,पाणीटंचाई असल्यावर

माणूस हाल अपेष्टा सोसत राही २


माणसानेच वृक्षतोड केल्यामुळे

सर्वांवर नैसर्गिक संकट ओढावले

पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे

माणसाने संकटग्रस्त जीवन अनुभवले ३


दुष्काळ ओला असो किंवा कोरडा

संकटांची मग सरबत्ती होणारच

महापूर,अतिवृष्टी,अवकाळी, ढगफुटी

अशा अति पाण्याने जनजीवन विस्कटणारच ४


कमी पाणी किंवा कोरडा दुष्काळ

सर्वांनाच भारी ठरणारा असतो

नव्हे तो दुष्काळ म्हणजे कर्दनकाळ

जीवनात समस्याच निर्माण करतो ५


ओला दुष्काळ अस्ताव्यस्त पाण्याचा

अतिवृष्टीने सारेच उध्वस्त करणारा

मन थिजवून सैरभैर वाटण्याचा

अचानकपणे येऊन माणसाचा जीव घेणारा ६


पाऊस बेभानपणे पृथ्वीराज बरसून

जनजीवन विस्कळीत करणारा

डोक्यावर दैवाचा घाला घालून

सर्वांसाठीच कर्दनकाळ ठरणारा ७


कुठलीही अतिशयोक्ती घातकच ठरते

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा लागतो

तेव्हा संकटांचा सामना करण्यासाठी

माणूसच देवासारखा धावून येत असतो ८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy