बदल
बदल
आहे का ओळख मित्रांनो अशमयुगीन मानव मी
सुंदर या धर्तीवर सर्वात आधी पोहोचलो मी
छोट्याश्या त्या जगात आमच्या भटकंती करत फिरलो मी
अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी आयुष्यभर लढलो मी
सुरवात झाली उत्क्रांतीची तेव्हाही तयार राहिलो मी
उत्क्रांतीच्या या पथावर सदैव शोधात राहिलो मी
अग्नीचा शोध लावून जीवनात तेज आणले मी
चाकाच्या शोधाने मग जीवन गतिशील केले मी
या साऱ्यांमुळे प्राथमिक गरजांची तृष्णाही भागवली मी
काळ बदलला,वेळ सरली,अग्नीची जागा मग विजेने घेतली
चाकाच्या जागी यंत्र आले आणि तंत्रज्ञान सारे विकसित झाले
मानवाचीही जागा मग यंत्रमानवाने घेतली
बुद्धीचीही जागा संगणकाने पटकावली
काळजी मग भेडसावू लागली, माणुसकी यातून लोप पावली
याच आधुनिक आंतरजालाने मग माणसे पुन्हा जोडली
याचाही साक्षीदार ठरलो मी या बदलांमुळे सुखवलो मी
मात्र नव्या पिढीसोबत स्वतःलाही बदललं मी
अशमयुगीन मानवाचा मग आधुनिक मानव बनलो मी
प्रगतीच्या साहाय्याने अत्याधुनिक मग झालो मी।।